राज्यात संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारासोबत टिकली लावली नाही म्हणून बोलण्यास नकार दिला होता. त्यावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. अशात आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी याच मुद्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खडे बोल सुनावले आहे.